चित्रपटात एक नायक आणि नायिका बर्याचदा प्रेमात पडतात आणि मग ते लग्न करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही वास्तविक जीवनातील प्रेमकथा सांगणार आहोत जिथे नायिका हिरोच्या नव्हे तर चित्रपट दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्या. त्यांच्यापैकी काहींनी दिग्दर्शक विवाहित असुनही त्याच्यासोबत लग्न करण्यात कोणतीही लाज दाखविली नाही.
कल्कि कोचलिन
अनुराग कश्यप जेव्हा ‘देव डी’ बनवत होते, तेव्हा त्यात कल्कि कोचलीन नायिका होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कल्की आणि अनुराग एकमेकांच्या खूप जवळ आले होते.
विशेष म्हणजे अनुराग कश्यपने कल्कीसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फो ट दिला होता. यानंतर, कल्की आणि अनुरागचे 2011 मध्ये लग्न झाले होते पण 2015 मध्ये या दोघांचा घटस्फो ट झाला.
उदिता गोस्वामी
पाप आणि जहर सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री उदिता गोस्वामीने दिग्दर्शक मोहित सूरीशी सन 2013 मध्ये लग्न केले होते. लग्नाआधी हे दोघे 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
राणी मुखर्जी
राणी मुखर्जी यशराज फिल्म्सचे मालक आदित्य चोप्रा यांची पत्नी आहेत. 2014 मध्ये या दोघांनी लग्न केले. आदित्य आधीच विवाहित होता पण तरीही त्याचे राणीशी अफेअर होते. राणी आणि आदित्यने इटलीमध्ये गुपचूप लग्न केले होते.
श्रीदेवी
श्रीदेवीने 1996 मध्ये बोनी कपूरसोबत लग्न केले होते. बोनीचे हे दुसरे लग्न होते. बोनी श्रीदेवीच्या प्रेमात खूप वेडा होता. श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. असे म्हणतात की बोनी श्रीदेवीला त्याच्या ठरवलेल्या फिल्म फीपेक्षा एक लाख रुपये अधिक देत असत. तो असे करायचा कारण त्याचे श्रीदेवीवर खुप प्रेम होते.
सोनाली बेंद्रे
2002 मध्ये सोनालीने बॉलिवूड दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्न केले. 1994 मध्ये ‘नाराज’ या चित्रपटाच्या सेटवर गोल्डी आणि सोनाली यांची भेट झाली. तेव्हा गोल्डीच्या बहिणीने त्याची सोनालीशी ओळख करून दिली.
गोल्डी तेव्हाच सोनालीच्या प्रेमात पडला होता. यानंतर पुन्हा एकदा ‘अंगारे’च्या सेटवर त्यांची भेट झाली. आणि इथेच गोल्डीने त्याच्या मनातले सोनालीला सांगितले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
किरण जुनेजा
किरण जुनेजा यांनी 1991 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पीशी लग्न केले. विशेष म्हणजे रमेशची आधीपासूनच एक पत्नी होती पण किरणशी लग्न करण्यासाठी त्याने घटस्फो ट घेतला होता. किरण आणि रमेश यांची ‘बुनियाद’ नावाच्या टीव्ही कार्यक्रमात भेट झाली होती. आणि इथूनच त्यांची प्रेमकहानी सुरु झाली.
सोनी राजदान
आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी 1986 मध्ये चित्रपट निर्माता महेश भट्टशी लग्न केले होते. तेव्हा महेश सोनीच्या इतक्या प्रेमात पडला की त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फो ट न देता सोनीशी लग्न केले. त्यानंतर नंतर महेश भट्टने पहिल्या पत्नीपासून घटस्फो ट घेतला.
ऑफिसमध्ये काम करत असताना तुम्ही कधी एखाद्याच्या प्रेमात पडले आहे का? कमेंटमध्ये आपली प्रेमकथा सामायिक करा.