आपल्याला माहित आहे की भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला खूप पवित्र बंधन मानले जाते, यामुळे केवळ वधू आणि वरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य ही एकमेकांसोबत बांधले जातात. प्रत्येक मुला-मुलीचे आपल्या लग्नाबद्दल बरीच स्वप्ने असतात.
प्रत्येक व्यक्तीला लग्नासाठी सर्वोत्कृष्ट जोडीदार हवा असतो जो त्याची आयुष्यभर काळजी घेईल आणि जो त्याच्या सुख दुःखामध्ये सोबत असेल. अशा परिस्थितीत काही लोक ऑरेंज मॅरेजला तर काहीजण लव्ह मॅरेजला प्राधान्य देतात. तथापि, आपण असे म्हणतो की आपल्या जोड्या हया स्वर्गातच बनलेल्या असतात.
पण आपण जर एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर त्याच्यासोबतच आपण आपले आयुष्य घालवण्याची स्वप्ने बघत असतो. तसे लग्न हा आपल्या जीवनातील सर्वात कठीण विषय असतो. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करण्यापूर्वी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पण अलीकडेच एका प्रेमात पडलेल्या मुलीने असे काही केले की तिच्या घरातील सदस्यांनाही धक्का बसला. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. जिथे एक मुलगा आणि मुलगी गेली सहा वर्षे शारीरिक सं-बंध ठेवून होते.
पण महत्त्वाचे म्हणजे हे दोघे दुसरे तिसरे कोण नसून ते एकमेकांचे लांबून बहीण भाऊ लागत होते. आपल्याला कदाचित माहित असेल की इस्लाम धर्मात, नातेवाईकांच्या मुलांबरोबर लग्न करणे ही फार प्राचीन परंपरा आहे. आजचे तरुण या परंपरेला महत्त्व देताना दिसत आहेत.
आणि आपल्या स्वतःच्या भावंडांशी प्रेमसं-बंध जोडत आहेत. जर आपण या मुलीबद्दल बोलायचे झाले तर तिच्या म्हणण्यानुसार त्या मुलाने प्रथम तिच्या सोबत गोड बोलून आपल्या प्रेमात पाडले आणि नंतर लग्नाचे नाटक करून तिच्याशी अनैतिक सं-बंध बनवले.
पण, जेव्हा त्या मुलीला त्या मुलाचे सत्य समजले तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या मुलीला कुठेतरी हे समजले की तिच्या सोबत इतक्या वर्षांपासून सं-बंध असलेल्या मुलाचे लग्न कोठेतरी होणार आहे. अशा परिस्थितीत तिने आपले नियंत्रण गमावले.
आणि धिंगाणा घालण्यासाठी ती त्या मुलाच्या घरी पोहोचली. या प्रकरणाची माहिती दोघांच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी त्या दोघांचे लग्न करण्यास नकार दिला आणि मग त्या मुलीने पोलिसांचा दरवाजा ठोठावला आणि तिने न्यायासाठी पोलिसांना विनवणी केली आहे.
माहितीनुसार, बिलारी पोलिस ठाणे परिसरात राहणारा एक तरुण गेल्या 6 वर्षांपासून आपल्या मावस बहिणीसोबत राहत होता आणि लग्नाचा बहाणा करून तिला टाळत होता. पण आता त्या मुलाचे लग्न ठरल्याची पुष्टी अन्यत्र झाली आहे. पण जेव्हा त्या मुलीला त्याच्या लग्नाविषयी कळले तेव्हा ती पोलिसांसह त्या मुलांच्या घरी आली.
आणि लग्न करण्याचा आग्रह धरू लागली आणि मग मुलांच्या कुटुंबीयांनी कोर्टात लग्न करून देण्याचे वचन देऊन त्या मुलीला तिच्या घरी परत पाठविले. मग दुसर्याच दिवशी ही मुलगी मुरादाबाद कोर्टात पोहोचली तेव्हा तो मुलगा आणि त्याचे कुटुंब तेथे आढळले नाही.
म्हणून ती संतापून त्वरित त्या तरूणाच्या घरी पोहोचली आणि तिथले दृश्य पाहून स्तब्ध झाली. खरं तर तिच्या प्रियकराच्या लग्नाचा कार्यक्रम चालू होता आणि तेव्हा वरमाला सुद्धा होणार होती. हे सर्व पाहून त्या मुलीने संपूर्ण गावात धिंगाणा घालायला सुरुवात केली.
त्यानंतर त्या गावात पंचायत बोलविण्यात आली. सद्यस्थितीत पंचायत कोणत्याही योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहे आणि त्या मुलीला सुद्धा तिला तिच्या घरातून हाकलून देण्यात आले आहे.