उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून नुकतीच एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. वास्तविक येथे एक नवविवाहित पति आपल्या पत्नीसमवेत हनीमून साजरा करण्यासाठी खूप उत्सुक होता. पण या वराला धीर धरणे शक्य नव्हते.
त्याला शक्य तितक्या लवकर आपल्या पत्नी समवेत सुहाग रात्र साजरी करायची होती, परंतु जशी त्याने सुहाग रात्र साजरी करण्यास सुरुवात केली, तेव्हा अचानकच त्याने आपल्या होणाऱ्या पत्नी समवेत पाहिलेल्या स्वप्नांचा अगदी चक्काचूर झाला आणि तो खाली पडला. खरं तर तो जा स्त्री सोबत आपले संपूर्ण आयुष्य काढणार होता.
ती एक स्त्री नव्हती तर तो एक किन्नर होता. बिचारा तो मुलगा ज्याने आपल्या होणाऱ्या पत्नी सोबत कितीतरी स्वप्न पहिली असतील, पण नशिबाने त्याच्याशी असा विनोद केला की त्याच्या संपूर्ण आयुष्याची वाट लागली. आता जेव्हा असे सत्य समोर आले होतेच तेव्हा कुठले प्रेम आणि कुठला रोमांस आता होणार होता.
तो फक्त धिगाणाच, इकडे पती ओरडायला लागला, मग पत्नीनेही जोरात ओरडायला सुरुवात केली. या परिस्थितीत आपल्या मुलाला पाहून त्याच्या घरातील सदस्य देखील हैराण होते. तोपर्यंत वराने देखील घाईघाईने आपल्या सासरच्यांना फोन लावला कारण त्यांना हे संपूर्ण सत्य माहित होतेच.
पण जेव्हा त्या वराने त्यांना तत्काळ बोलावून घेतले तेव्हा त्या मुलीच्या घरातील सदस्यांनी देखील हंगामा करायला सुरुवात केली. त्यांनी त्या मुलाच्या कुटूंबावर दबाव आणायला सुरुवात केली की आता लग्न झाले आहे आणि आता मुलगी किन्नर तर त्यात काय हरकत आहे? आपण हे लग्न अजिबात मोडू शकत नाही.
वराला आपल्या पत्नीबद्दल जाणून मिळालेला धक्का आणि आता त्या मुलीच्या कुटूंबातील सदस्यांचा असणारा दबाव पाहून तेव्हा त्याने पोलिसात जाणे उच्चीत समजले. आता पोलिस हे प्रकरण समजून घेण्याचा आणि दोन्ही बाजूकडील लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तथापि किन्नर मुलीचा कोणत्याही प्रकारे आम्ही स्वीकार करणार नाही असे त्या मुलांकडील लोकांचे म्हणे होते आणि आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे.