असे म्हटले जाते की जगातील कोणतीही शक्ती दोन प्रेम करनार्यांची भेट थांबवू शकत नाही. भारतात प्रेम विवाहासाठी सर्वच कुटुंब परवानगी देत नाहित. अशा परिस्थितीत, काही जोडप्यांना इच्छा नसताना घरातून पळून जावुन आपल्या प्रियकराशी लग्न करावे लागते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा काही विवाहित जोडप्यांचा परिचय करून देणार आहोत ज्यांनी कुटूंबाच्या इच्छेविरूद्ध लग्न केले.
शम्मी कपूर आणि गीता बाली
‘रंगीन रातें’ चित्रपटाच्या सेटवर शम्मी कपूर गीता बालीच्या प्रेमात पडला होता. गीता शम्मीपेक्षा एक वर्ष मोठी होती. शम्मीला भीती वाटत होती की त्याचे कुटुंब लग्नासाठी राजी होणार नाही, म्हणून ते दोघे पळून गेले आणि मुंबईतील बंगाना मंदिरात लग्न केले. या लग्नाचे साक्षीदार दिग्दर्शक-निर्माता हरी वालिया होते.
भाग्यश्री पटवर्धन आणि हिमालय दसानी
भाग्यश्रीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी हिमालय दासानीशी लग्न केले. शाळेपासूनच हे दोघे नात्यात होते. भाग्यश्री शाही मराठी कुटुंबातीलआहे, त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांना हे लग्न मान्य नव्हते. म्हणून त्या दोघांनी पळून जावून लग्न केले.
आमिर खान आणि रीना दत्त
रीना आमिर खानच्या शेजारी राहात होती. वयाच्या 21 व्या वर्षी आमिरने रीनाला प्रपोज केले होते. आमिरने आपल्या रक्ताने प्रेमाचे पत्र देखील लिहिले होते. दोघेही वेगळ्या धर्माचे होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. अशा परिस्थितीत आमिर आणि रीनाने पळून जावून लग्न केले. काही वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला आणि आमिरने किरण रावसोबत दुसरे लग्न केले.
शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी
शक्ती कपूर 16 वर्षीय शिवांगी कोल्हापुरीच्या प्रेमात पडले होते. शिवांगीच्या कुटुंबातील लोक मात्र मागासलेल्या विचारांचे होते. त्यांनी शिवांगीला कधी खुल्या केसांमध्येही फिरू दिले नाही. अशा परिस्थितीत, तिच्या कुटुंबीयांना लग्नासाठी तयार करने अशक्य होते. दोन वर्षांनंतर शिवांगी जेव्हा 18 वर्षांची झाली तेव्हा ती खुप धैर्य करुन घरातून पळून आली आणि तिने शक्ती कपूरशी लग्न केले.
पद्मिनी कोल्हापुरी आणि प्रदीप शर्मा
बहीण शिवांगी प्रमाणे पद्मिनीने देखील पळून जावुन लग्न केले. प्रदीप शर्माने पद्मिनीला आपल्या ‘ऐसा प्यार कहां’ या चित्रपटासाठी साइन केले होते. येथूनच त्यांची प्रेमकथा सुरू झाली. दोघेही वेगवेगळ्या समाजातील होते, त्यामुळे त्यांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले नाही. हेच कारण होते की त्यांनी मुंबईत एका मित्राच्या घरी लग्न केले.
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी
रामायणच्या या प्रसिद्ध जोडप्याने 2011 मध्ये अधिकृतपणे लग्न केले आहे, परंतु फारच थोड्या लोकांना हे माहिती आहे की या दोघांनी 2006 साली देखील लग्न केले होते. त्यावेळी गुरमीत आणि देबिना 19 आणि 20 वर्षांचे होते. त्याने कुटुंबीयांना न सांगता मित्रांच्या मदतीने गुडगावच्या मंदिरात लग्न केले होते.
शशी कपूर आणि जेनिफर केंडल
जेनिफर थिएटर करत असताना तिची शशी सोबत भेट झाली. लवकरच ते दोघे प्रेमात पडले. जेनिफरच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता म्हनुन या दोघांनी पळून जाऊन लग्न केले.