सोशल मीडियावर कायमच चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतं. लग्न म्हणजे नेमकं काय असतं? हा आताच्या तरूणाईला पडलेला प्रश्न कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. लग्न करून तरी काय फायदा? लग्न का करायचं?
घटस्फोटाचं प्रमाण इतकं असताना लग्न का करायचं? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात. लग्न म्हणजे दोघांचा संसार. लग्न म्हणजे वाद-विवाद. यासगळ्या संकल्पनांना बाजूला सारत लग्न म्हणजे नेमकं काय? हे या व्हिडिओत सांगितलं आहे. अभिजीत राजेंनी सांगितलंय की, लग्न म्हणजे जेवताना कुणाची तरी सोबत.
बाईकवर कुणीतरी हक्काने मागे बसणार यासारखी प्रेमळ भावना म्हणजे लग्न. होय हे सगळं खरं आहे पण काही लोकांनी या पवित्र नात्याचा धंदा करून टाकला आहे. आपल्या या समाजात असे अनेक लोक आहेत जे या पवित्र नात्याला काळिमा फासत आहेत. आता बघा ना या मुलीने तर हद्दच करून टाकली आहे. चला तर जाणून घेऊ की हिने असे काय केले आहे.
आपण डाली की डोली हा चित्रपट पाहिलाच असेल ज्यात सोनम कपूर लग्न करून अनेक लोकांना लुबाडण्याचे काम करताना आपल्याला दिसली आहे. पण आज खऱ्या आयुष्यात यूपीच्या नोएडामध्ये पोलिसांनी अशा एका धोकेबाज मुलीला अटक केली आहे, जी अनेक लग्ने करून अनेक मुलांना फसवत होती.
या मुलीचे एक-दोन नव्हे तर तब्बल आकरा मुलांसोबत लग्न झाले होते, त्यातील बहुतेक मुले ही दिव्यांग व घटस्फोटित होती पण लग्नानंतर काही दिवसांनंतर ही मुलगी त्या घरातील सर्व रुपये आणि दागिने घेऊन फरार व्हायची.
एमबीए पास, गोरा रंग, पाच फूट दोन इंचाची लांबी व सुशिक्षित कुटुंब, आता एखाद्या दिव्यांग आणि घटस्फोटित मुलाला अशी मुलगी आढळल्यास त्याची लॉटरीच लागली असे आपण म्हणू, मेघा भार्गव असे या मुलीचे नाव असून तिचे वय 26 वर्षे आहे आणि 11 विवाहसोहळे करण्यामागचा तिचा हेतू फक्त पैसे कमविणे हा होता.
लग्नानंतर ती वर आणि त्याच्या कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या खायला घालत असे आणि पैसे आणि दागिने घेऊन पळून जात असे. या कामात तिची मोठी बहीण आणि तिचे दाजी तिला मदत करत असत. या मुलीने वेगवेगळ्या राज्यात 11 मुलासोबत लग्न केले आहे आणि त्या मुलांना आपला बळीचा बकरा बनविले आहे.
नोएडा पोलिसांनी सांगितले की, आरोपी मेघा भार्गव मूळची ग्वाल्हेरची असून केरळ पोलिस फसवणूकीच्या प्रकरणात तिचा शोध घेत होते. केरळ राज्यातील कोची येथे नुकतेच मेघाने लॉरेल नावाच्या युवकाशी लग्न केले आणि त्यानंतर ती 15 लाख रुपये व दागिने घेऊन आपल्या घरातून पळून गेली.
एफआयआर नोंदविल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, केरळमध्येच तिने अनेक विवाह केल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये 6 विवाह करून मेघाने या सर्व कुटुंबांची लूटमार केली आहे. त्यामुळे आपण सुद्धा सावध रहा.