यावर्षी नोव्हेंबरमध्ये देशभरातील अनेक महिलांनी करवा चौथचा उपवास अगदी धुमधडाक्यात साजरा केला. हिंदू धर्मात करवा चौथ उपवासाला खूप महत्वाचे स्थान आहे. या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांच्यासाठी निर्जल व्रत ठेवतात.
आपण कदाचित बगितले असेल की टीव्ही ते बॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत
अनेक महिला करवा चौथचा उपवास करत असतात. तसेच बर्याच अभिनेत्रींनी यावेळी प्रथमच करवाचौथचा उपवास साजरा केला आहे. त्याचा करवा चौथ लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
दरम्यान, चित्रकूटच्या कुटूंबातील करवा चौथ सोहळ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहेत. पण या फोटोमध्ये अशी एक गोष्ट आहे जी गोष्ट बघून अनेक लोक अभिनेत्रींचे फोटो सुद्धा बघायचे विसरून जातील.
आपणास आम्ही सांगू इच्छितो कि या फोटोमध्ये जी एक खास गोष्ट ती म्हणजे या फोटोमध्ये दिसणाऱ्या पतीच्या तीन बायका आहेत म्हणजेच त्याला तीन पत्नी आहेत आणि त्या एकत्र करवा चौथचा उपवास सोडताना आपल्याला दिसत आहेत.
एकमेकांच्या सख्या बहिणी आहेत या महिला:-
सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे करवा चौथचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याविषयी अधिक माहिती काढली असता हे फोटो चित्रकूट कुटुंबातील असल्याचे समजले. जेथे कृष्णा नावाच्या या माणसाला तीन बायका आहेत. कृष्णाच्या या तीन बायका शोभा.
रीना आणि पिंकी या तिघी देखील एकत्र राहतात. या तीन बहिणींचे कृष्णासोबत सुमारे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासून या तिघी ही एकाच घरात अगदी आनंदाने राहत आहेत. असे म्हणतात की या तिघीमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वाद होत नसतो.
त्या तिघी सुद्धा आपल्या पतीसोबत अगदी आनंदाने आणि प्रेमळपणे आयुष्य जगत आहेत. पण जेव्हा या कुटूंबाबद्दल माहिती काढली गेली तेव्हा असे आढळले की या तिन्ही बहिणी अशिक्षित नसून पदवीधर आहेत. या तिघीनी बुंदेलखंड विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे.
यासारख्या शिक्षित मुली एकाच पती सोबत राहताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
संपूर्ण जगाला द्यायचा आहे त्यांना संदेश:-
सामान्यत: कोणत्याही बायका इतर स्त्रीबरोबर आपल्या पतीची मैत्री पसंत करत नाहीत. अशा परिस्थितीत या तीन बहिणीं एकाच पतीसोबत अगदी प्रेमाने राहत आहेत हे सर्वांसाठीच अतिशय धक्कादायक आहे. आपणास सांगू इच्छितो की कृष्णापासून या तिन्ही बायकाना दोन दोन मुले सुद्धा आहेत.
आणि ही सर्व मुले एकमेकांसोबत अगदी प्रेमाने राहतात. पण असे म्हटले जाते की या तीन बायका आपल्या पतीला सामान्य व्यक्ती मानत नसून राजा दशरथचा अवतार मानतात. त्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे जगून त्यांना संपूर्ण जगाला एक उदाहरण द्यायचे आहे. एखादी स्त्री इच्छित असल्यास काय करू शकते हे त्यांना सांगायचे आहे.
या तिन्ही बायका म्हणतात की त्यांच्याकडे महाकालीदेवी पासून त्यांना दैवी शक्ती मिळाल्या आहेत. ज्याच्या बळावर त्यांना संपूर्ण जगाला सांगायचे आहे की एक स्त्री आपल्या इच्छाशक्तीने आपल्या सामान्य नवऱ्याला राजा दशरथचा दर्जा देऊ शकते.