तुमच्या माहितीकरिता सांगू इच्छितो कि, अमिताभ आणि माधुरी हे ‘ओए मखना’ या गाण्यात एकत्र दिसले पण त्यांनी कधीच एकत्र चित्रपट केला नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली पण ते कधीही एकत्र दिसले नाहीत.
त्यातील पहिले नाव बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांचे आहे. अमिताभ आणि माधुरी हे ‘बडे मियां छोटे मियां’ च्या ‘ओए मखना’ या गाण्यात एकत्र दिसले. हे गाणे देखील जबरदस्त हिट ठरले होते.
परंतु तरीही अमिताभ आणि माधुरी कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. चला तर तुम्हाला सांगतो की हे दोन सुपरस्टार कोणत्याही वादविवादाशिवाय कधी एकत्र का दिसले नाहीत.
दोघांचे एकत्र काम न करण्याचे हे कारण होते.
वास्तविक माधुरीने 80 च्या दशकात पदार्पण केले होते. सुरुवातीला माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याच वेळी तोपर्यंत अमिताभ एक मोठा स्टार झाला होता. माधुरी तिचे यश शोधत होती आणि तिची ती प्रतिक्षा अनिल कपूरबरोबर थांबली.
माधुरीने अनिलसमवेत बेटा, तेजाब, हिफाजत, परिंदा यांसारखे अनेक मोठे हिट चित्रपट दिले. ही जोडी सुपरहिट झाली आणि माधुरीही मोठी स्टार बनली. अशा परिस्थितीत जेव्हा माधुरीला अमिताभबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा अनिल कपूर यांनी नकार दिला.
असं म्हणतात की त्या काळात माधुरीबद्दल अनिल कपूर खूप सकारात्मक झाले होते. एक तर त्यांना माधुरी आवडत होती आणि दुसरे त्यांना पदद्यावर आपली आणि माधुरीची जोडी सर्वोत्कृष्ट राहू द्यायची होती. अशा परिस्थितीत माधुरीने अमिताभसोबत कोणताही चित्रपट केला नाही.
माधुरी अनिलपासूनही दूर झाली होती
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माधुरीसोबत असे एकदाच झाले नव्हते. अमिताभ व्यतिरिक्त सनी देओल आणि माधुरीची जोडी एकापेक्षा जास्त वेळा एकत्र दिसली नाही. माधुरी आणि सनीने ‘त्रिदेव’ चित्रपटात एकत्र काम केले होते, ज्याला पडद्यावर खूप पसंती मिळाली होती.
सनी आणि माधुरीची केमिस्ट्रीसुद्धा चांगलीच पसंत केली होती, पण हे फक्त एकदाच झाले. याचे कारणही अनिल कपूर होते. त्या काळात अनिल आणि सनी प्रथम क्रमांकावर येण्याची स्पर्धा करत होते आणि त्यामुळे बोनी कपूर आपल्या भावाला हिट करण्यासाठी माधुरीला त्याच्या सोबत कास्ट करत असे.
असेही म्हणतात की या सर्व गोष्टींमुळे माधुरी खूप अस्वस्थ झाली होती आणि यामुळेच तिने अनिलपासून अंतर बनवायला सुरुवात केली. दोघांनीही एकत्र काम करणे बंद केले होते. त्यानंतर बर्याच वर्षांनंतर अनिल आणि माधुरीने टोटल धमाल या चित्रपटात एकत्र काम केले.
मात्र, ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटा नंतर अमिताभ आणि माधुरी कधीही एकत्र दिसले नाहीत. या चित्रपटातही हे दोघे फक्त एका गाण्यासाठी एकत्र आले होते. याशिवाय केबीसीच्या एका हंगामात माधुरी अमिताभची पाहुनी म्हणून आली होती आणि लोकांना त्यांची जुगलबंदी खूप आवडली होती.
करिअरबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन ब्रेक न घेता सतत चित्रपट करत राहिले. अमिताभ आयुष्मान खुरानासोबत ‘गुलाबो-सीताबो’ या चित्रपटात दिसनार आहेत. यानंतर ते रणबीर कपूर आणि आलियासमवेत ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे माधुरी दीक्षित अखेर ‘कलंक’या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट पडद्यावर चांगली कामगिरी करू शकला नाही.