आजकाल सर्वत्र लग्नाचा माहोल आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की त्याचे अगदी धुमधडाक्यात झाले पाहिजे आणि मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कोट्यावधी रुपये खर्च करत असतो. वेडिंग हॉल, 56 प्रकारचे डिशेस, महागड्या सजावटीच्या वस्तू, डीजे,अनेक पाहुण्यांना भेटवस्तू या सर्व गोष्टींमध्ये आपण पाण्यासारखा पैशा खर्च करतो.
आज लग्नाला प्रचंड विलासी बनवण्याचा ट्रेंड चालू आहे. येथे, लोक फक्त एक दिवसाचा मोठेपणा आणि अभिमान दर्शविण्यासाठी त्यांचे आजीवन उत्पन्न वाया घालवतात. पण आपण आपल्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यावर आपण समाजासाठीही काहीतरी केले पाहिजे.
असा आपण कधी विचार केला आहे का? साधारणत: याबद्दल कुणीच विचार करत नाही. पण असे म्हणतात की जगातील प्रत्येक माणूस एकसारखा नसतो. आपल्या समाजात दुसऱ्याचा विचार करणारे काही चांगले लोकही आहेत.
आज आम्ही आपल्याला अशाच एका थोर दिलदार आणि समाज जागरूक जोडीची ओळख करून देणार आहोत ज्यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी असे काही केले आहे की, ज्यामुळे आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान वाटेल. खरं तर, नुकतेच मध्य प्रदेशातील उज्जैन या शहरात झालेले हे लग्न आपल्या समाजासाठी एक आदर्श ठरले.
या लग्नात वराला आपल्या लग्नाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. म्हणूनच, त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत सात फेरे घेण्यापूर्वी त्याने वधूबरोबर असे काही केले की, जे पाहून तेथील सर्व लोक आश्चर्यचकित झाले.
वराने त्याच्या लग्नात रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला:-
खरं तर, लग्नाच्या सर्व विधी पार पडल्यानंतर वर आणि वधू सात फेऱ्यासाठी जात असताना, डॉक्टरांची एक टीम तिथे आली. हे आलेले डॉक्टर पाहून लोक सुद्धा खूप घाबरून गेले. मग वराने सर्वांना शांत करून आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.
थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी रक्त दान करण्याची आपली इच्छा असल्याचे वर म्हणाला. म्हणून, कोणालाही ज्याच्या त्यांच्या इच्छेसह रक्तदान करून या ग्रस्त मुलांना मदत करण्याचे त्याने आव्हान केले. यानंतर, अनेक लग्नात आलेल्या व्यक्तींनी रक्तदान केले.
यानंतर वरानेही वधूबरोबर रक्तदान केले. हे रक्त थॅलेसीमियाने ग्रस्त मुलांच्या वैद्यकीय मदतीसाठी वापरले जाईल असे सांगण्यात आले. सुरुवातीला वरच्या या कृत्याबद्दल उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले, परंतु जेव्हा वराने त्याच्या इच्छेबद्दल सर्व काही तपशीलवार सांगितले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
या लग्नात काय होत आहे हे पाहून, वराच्या या उदात्त कार्याची आणि अनोख्या विवाहाची बातमी उज्जैन आणि मध्य प्रदेशात पसरली. आता प्रत्येकजण वराच्या या उदात्त विचारांचे कौतुक करीत आहे.