आई वडील खूप विचार करून आपल्या मुलांचे लग्न निश्चित करतात, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या बाबी तपासणी करून पहिल्या जातात. मुलगा किंवा मुलगी किती शिकली आहे त्याप्रमाणे, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि तो सध्या काय काम करतो इत्यादींचा तपास केला जातो.
परंतु काहीवेळा ही केलेली पडताळणी योग्य नसते आणि त्यामुळे काहीवेळा सं-बंध कायमचे तुटतात. होय, लग्न होई पर्यंत लग्नात काहीही घडू शकते. मध्य प्रदेशातही असेच काहीसे घडले आहे. मध्य प्रदेशात दोन फेऱ्यांच्या नंतर लग्न रद्द झाले आणि वराला वधूशिवाय वऱ्हाड घेऊन घरी खाली हात परतावे लागले.
तर आज आपण या लग्नात असे काय झाले ते जाणून घेणार आहोत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील ईसागढच्या ओडिला गावात एक लग्न चालू होते, जे लग्न कुटुंबातील सदस्यांनीच मोडले. लग्नाची तयारी दोन महिने चालली होती, लग्नाचे वऱ्हाड सुद्धा अगदी नाचत गाजत लग्नासाठी आले होते.
इतकेच नाही तर लग्नासाठी मुलगा-मुलगी मंडपात सुद्धा बसले, सर्व विधी पूर्ण झाल्या, परंतु सात फेरे पूर्ण होऊ शकले नाहीत आणि लग्न मोडले गेले. लग्न मोडल्या नंतरही वधू-वरांचे कुटुंब एकमेकांवर स्वतंत्रपणे आरोप करत होते.
दोन फेरे झाल्यावर लग्न मोडले:-
कन्या पक्षाच्या मते, लग्नासाठी मंडप सजविण्यात आला होता, वधू-वरही तेथे आले होते. लग्नाचा विधी सुद्धा सुरू झाली होता, पण हा सोहळा फक्त दोन फेरे होई पर्यंत टिकू शकला. दोन फेऱ्यानंतर, कन्या पक्षाने लग्न थांबवले. कन्या पक्षाचे म्हणणे असे होते की मुलगा आणि मुलगी यांचे गोत्र एक आहे, यामुळे हे दोघे सुद्धा कमेकांचे बहीण भाऊ झाले, म्हणूनच हे लग्न रद्द करण्यात आले.
ट्रक मधून वऱ्हाड घेऊन गेल्यामुळे लग्न मोडले:-
मुलीच्या बाजूकडून झालेले सर्व आरोप फेटाळत मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की आम्ही ट्रक आणि ट्रॅक्टरने वऱ्हाड घेऊन गेलो नाही, पण मुलीकडच्या लोकांनी हे लग्न मोडले. लग्न झाल्यानंतर मुलाकडच्या लोकांनी वऱ्हाड ट्रक आणि ट्रॅक्टरने घेऊन गेले जे मुलीकडच्या लोकांना आजिबात आवडले नाही.
आणि लग्न मोडल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिस ठाण्यात गेले, तिथे या प्रकरणाची सुनावणी झाली. इतकेच नाही तर लग्न मोडल्यानंतर मुलींकडच्या लोकांनी ट्रॉलीमधून सर्व रुकवताचें सामान घेतले.
17 जून रोजी ठरले होते लग्न:-
मुलाकडच्या लोकांनी सांगितले की मुलींची कसून चौकशी केली होती आणि त्यानंतर हे लग्न ठरले होते, परंतु नंतर त्यांनी जीपमधून वऱ्हाड आणण्यास सांगितले, पण तेव्हा आमचे बजेट बनले नाही, यामुळे आम्ही लग्नासाठी वऱ्हाड ट्रक आणि ट्रॅक्टरने आणले.
परंतु यामुळेच येथे त्याची भांडणे झाली. तथापि, पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत परंतु मुलीचे लोक हे लग्न करण्यास सहमती दर्शवित नाही आहेत.