गोविंदाच्या या 5 सर्वात मोठ्या चुका, ज्यांनी बर्बाद केले त्याचे संपूर्ण करिअर, अशाप्रकारे बॉलीवूड मधून झाला गायब पहा…

बॉलिवूडमध्ये 'चिची' म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार गोविंदा हे कोणते अनोळखी नाव नाही. हिंदी चित्रपट पाहणारा जवळपास प्रत्येक दर्शक गोविंदाला स्क्रीनवर बघुन नक्कीच हसला असेल. आपल्या कॉमिक टायमिंग आणि चमकदार नृत्यासह कोट्यावधी हृदयावर राज्य करणारा गोविंदा पुर्वी सुपरस्टार होता. पण आजही त्याचा अभिनय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. गोविंदा आता आधीसारखा सुपरस्टार राहिला नाही. सध्या तो चित्रपटांमध्ये क्वचितच दिसतो. तो लाईमलाइटपासून दूर आहे. आधीची धमक आणि लोकप्रियता गमावण्यास गोविंदा स्वत: जबाबदार आहेत. तो सुपरस्टार बनला पण अक्षय कुमार, अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसारखे आपले स्टारडम त्याला टिकवून ठेवता आले नाही. कारकिर्दीच्या शिखरावर असताना गोविंदाने अशा बर्‍याच चुका केल्या ज्यामुळे त्याने त्याचे स्टारडम गमावले. 21 डिसेंबर रोजी त्यानी आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. चला तर जाणुन घेऊया की गोविंदाने आपल्या कारकिर्दीत कोणत्या चुका केल्या ज्यामुळे आज तो कारकिर्दीच्या या टप्प्यावर आहे. प्रमुख भूमिकेसाठी आग्रह वाढत्या वयानुसार मुख्य भूमिकेची मागणी करणे देखील गोविंदाच्या कारकीर्दीसाठी घातक ठरले. मुख्य भूमिकेमुळे त्याने अनेक चित्रपट गमावले. 'देवदास' या चित्रपटामध्ये त्याला चुन्नीलालच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, असे त्यानी आपल्या मुलाखतीत उघड केले होते. परंतु त्याला हा रोल सपोर्टींग वाटला आणि त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. नंतर ही भूमिका जॅकी श्रॉफने साकारली जी नंतर खूपच प्रसिद्ध झाली. मुख्य भूमिकेच्या आग्रहामुळे असे बरेच सिनेमे गोविंदाच्या हातातून निघून गेले. त्याचे समकालीन अभिनेते अनिल कपूर आणि संजय दत्त यांनी सपोर्टींग रोलला कधीही नकार दिला नाही. आज हे दोघ चित्रपट करत आहेत. गोविंदाची हिच गोष्ट चुकली. राजकारणात प्रवेश केला असे पाहिले जाते की जेव्हा अभिनेता आपल्या कारकीर्दीच्या उतारावर असतो तेव्हा तो राजकारणात प्रवेश करतो. पण गोविंदाने कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली, ती जिंकली. परंतु त्याचा चित्रपट प्रवास राजकारणाच्या काळात ठप्प झाला. तथापि, गोविंदाला नंतर कळले की राजकारणाने त्याची कारकीर्द उध्वस्त केली. त्यानंतर तो पुन्हा चित्रपटांमध्ये आला पण त्याला पूर्वीसारखी धमक मिळवता आली नाही. डेव्हिड धवनसोबत वाद बॉलिवूडमध्ये एक काळ होता जेव्हा डेव्हिड धवन आणि गोविंदाची जोडी प्रसिद्ध होती. ही जोडी बॉक्स ऑफिसवर हिट मानली जात होती. दोघांनी जवळपास 20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या हिट जोडीने 'हीरो नंबर 1, कुली नंबर 1,'शोला और शबनम' यासारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या जोडीचा शेवटचा चित्रपट 'पार्टनर' होता जो 2007 मध्ये आला होता. डेव्हिड धवनसोबत संबंध बिघडल्यानंतर गोविंदा त्याचे चित्रपटांमधील आकर्षण परत आणू शकला नाही. सलमानवर नाराज झाला बॉलिवूडमध्ये सलमान आणि गोविंदाच्या मैत्रीचे उदाहरण दिले जात होते. दोघांनी 'पार्टनर' या चित्रपटात सोबत काम केले होते जो सुपरहिट सिद्ध झाला होता. पण एक काळ असा होता की गोविंदा सलमानवर नाराज झाला. याचे कारण म्हणजे सलमान गोविंदाच्या मुलीला दबंग चित्रपटातून लॉन्च करणार होता, पण जेव्हा ते झाले नाही तेव्हा दोघांचे नातं तुटले. त्याचा गोविंदाच्या कारकीर्दीवरही परिणाम झाला. गोविंदाची फिटनेस आजचे सर्व कलाकार मग ते सपोर्टींग असो किंवा लिड, सर्वच तंदुरुस्त दिसतात. एक काळ असा होता की जेव्हा गोविंदा खूप लठ्ठ झाला होता. त्याचा लठ्ठपणा देखील त्याच्यासाठी खूप हा निकारक ठरला. त्याला मुख्य भूमिकेत चित्रपट मिळणे बंद झाले. नंतर, लोकांचे असेही मत बनले की अशा तंदुरुस्तीसह अभिनेते फक्त साईड रोल करू शकतात. बॉलिवूडने गोविंदाला त्याच्या फिटनेसमुळे स्टारडमपासून दूर केले. गोविंदा एक उत्तम अभिनेता आहे यात काही शंका नाही. पण वेळ लक्षात ठेवून जर गोविंदाने स्वत: ला बदलवलं असतं तर आज देखील त्याच्या चाहत्यांनी त्याची कामगिरी पडद्यावर पाहिली असती.

Leave a Comment